Header Ads

Header ADS

Crime News: अयान, रियान, आझाद, हर्षित...; तुझे प्रियकर किती? तरुणीवर भररस्त्यात सपासप वार


 Crime News: अयान, रियान, आझाद, हर्षित...; तुझे प्रियकर किती? तरुणीवर भररस्त्यात सपासप वार


लेवाजगत न्युज भोपाळ: मध्य प्रदेशच्या नीमच शहरात दिवसाढवळ्या एका तरुणीवर चाकूनं हल्ला करण्यात आला. एका माथेफिरु तरुणानं त्याच्या प्रेयसीवर तीन ते चार वेळा चाकूनं वार केले. जखमांमुळे रक्तबंबाळ झालेली तरुणी मदतीसाठी गयावया करत होती. पण तिच्या मदतीला कोणीही आलं नाही. आसपासचे लोक घटनेचं चित्रीकरण करत राहिले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती गंभीर आहे.




शहरातील गांधी वाटिकेजवळ असलेल्या केसरपुरा भागात राहणाऱ्या कुलदीप वर्मा नावाच्या तरुणीनं नीमच शहरात वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय तरुणीवर चाकूनं सपासप वार केले. रक्तबंबाळ झालेली तरुणी वेदनेनं कळवळत होती. मदतीसाठी याचना करत होती. पण कुलदीपचा राग शांत झाला नव्हता. तो जोरजोरात ओरडत होता. 'प्रेम करुन विश्वासघात करते. आमचे पैसे खाते. हिनं प्रेम करुन मला सोडून दिलं. किती बॉयफ्रेंड आहेत तुझे? अयान, रियान, आझाद, हर्षित,' असं म्हणत कुलदीपनं संताप व्यक्त केला.

आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर केंट पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे.

चाकू हल्ल्याची घटना प्रेम प्रकरणातून घडली असावी असा प्राथमिक अंदाज केंट पोलीस ठाण्याचे प्रभारी सौरभ शर्मांनी वर्तवला. 'आरोपी व्हिडीओमध्ये प्रेमात विश्वासघात झाल्याचं सांगताना दिसतोय. त्यामुळे हा प्रकार प्रेम संबंधातून घडला असावा. तरुणीला शुद्ध आल्यावर तिचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर याबद्दल अधिक स्पष्टता येईल. घटना प्रेमातून घडली की एकतर्फी प्रेमातून हे अद्याप तरी समजू शकलेलं नाही. आम्ही अधिक माहिती गोळा करत आहोत,' असं शर्मा म्हणाले.

धक्कादायक बाब म्हणजे तरुणी वेदनेनं विव्हळत असताना तिथे असलेले लोक घटनेचा व्हिडीओ काढत होते. तरुणीच्या मदतीला कोणीही आलं नाही. मदतीसाठी हात पुढे करण्याऐवजी लोकांनी व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली. आरोपी कुलदीप वर्मा ज्ञानोदय कॉलेजचा विद्यार्थी आहे. तो भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी राहिला आहे. त्यानं ज्या तरुणीवर हल्ला केला, त्या तरुणीसोबत कुलदीपची शाळेपासून मैत्री आहे. पण आता तिनं कुलदीपशी बोलणं बंद केलं. त्यामुळे तो संतापला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.