Header Ads

Header ADS

उष्माघातामुळे यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेतमजुर तरूणाचा दुदैवी मृत्यू

The-unfortunate-death-of-a-farm-labourer-youth-at-Dahigaon-in-Yaval-taluka-due-to-heat-stroke


उष्माघातामुळे यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेतमजुर तरूणाचा दुदैवी मृत्यू

वृत्तसंस्था यावल-जळगाव जिल्ह्यातसध्या उष्णतेची लहर मोठ्या प्रमाणात सुरू असून यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतमजूर तरूणाचा बळी गेल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

   जळगांव सह यावल तालुक्यात उष्णतेचा हाहाकार सुरू असून यावर्षी तापमान प्रथमच ४६ अंश सेल्शियस गेल्याने लोक त्रस्त झाले आहेत. यातच दहिगाव तालुका यावल येथील तरुणाचा उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची  तालुक्यातील उष्माघाताची दुसरी घटना घडली आहे.


यावल तालुक्यातील दहिगाव येथील महाजन गल्लीतील शेतमजूर वैभव धर्मराज फिरके (वय २७ वर्ष ) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. वैभव हा नुकताच शेतातून घरी परतला असता सायंकाळी पाच वाजेचे सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यावर खाजगी डॉक्टरांनी उपचार करीत असतांना तो मयत स्थितीत आढळून आला. वैभव फिरके यांचा मृत्यू वाढत्या तापमानाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उष्माघाताने बळी गेल्याची ही यावल तालुक्यातील दुसरी घटना आहे.

 कुटुंबात एकुलता एक मुलगा होता मयत वैभव फिरके हा. त्याच्या पश्चात आई, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.