Header Ads

Header ADS

स्पर्धा परीक्षेत तीन गुणांनी नापास झाल्याने विद्यार्थ्यांने घेतले टोकाचे पाऊल; राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या


  स्पर्धा परीक्षेत तीन गुणांनी नापास झाल्याने विद्यार्थ्यांने घेतले टोकाचे पाऊल; राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या


लेवाजगत न्युज जळगांव:- महाराष्ट्र राज्य आयोगाकडून घेण्यात आलेल्या मंत्रालयातील क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने नैराश्यातून शिरसोली येथील विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री 8 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश भिमराव बारी (वय 25) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या आधी देखील आकाशने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अनेक परीक्षा दिल्या होत्या. मात्र, त्या परीक्षांमध्ये सातत्याने अपयश येत असल्याने आकाश मानसिकरित्या खचला होता. त्यात गुरुवारी एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीचा परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली. या अपयशामुळे आकाश अधिकच खचला.

शुक्रवारी त्याच्या घरातील एका खोलीत आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री 8 वाजता आकाशचा मोठा भाऊ सुरज हा कंपनीतून घरी आल्यानंतर, त्याला शेजारच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आकाश आढळून आला, लागलीच त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आकाशच्या पश्चात आई, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे. आकाश च्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.