Header Ads

Header ADS

विद्यार्थ्यानी इतर बौध्दीक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतला तरच व्यक्तित्त्वाचा सर्वांगीण विकास होतो : डॉ.पद्माकर पाटील


 विद्यार्थ्यानी इतर बौध्दीक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतला तरच व्यक्तित्त्वाचा सर्वांगीण विकास होतो : डॉ.पद्माकर पाटील

लेवाजगत न्युज फैजपूर:-

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे सर तसेच प्रमुख उपस्थिती डॉ.पी.डी.पाटील सर अधिसभा सदस्य कबचौउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव होते.

  सहादिवस घेण्यात आलेल्या या अभियानात 75 विद्यार्थिनींचा सहभाग होता. अभियानाचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 2024 ला झाले त्यात उद्घाटक म्हणून यावलच्या सरकारी वकील सुल्ताना तडवी यांनी महिलांसाठी विविध कायदे याची माहिती दिली, दुसऱ्या दिवशी अनिल हेडाऊ, शाखा व्यवस्थापक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स भुसावल यांनी राष्ट्रीयकृत बँकेत महिलांसाठी विविध योजनांची माहिती दिली, तिसऱ्या दिवशी डॉ. संजीवकुमार साळवे जी.जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर  यांनी महिला स्वयंरोजगार व विविध योजना, तसेच चौथ्या दिवशी डॉ. गौरव चौधरी यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले,पाचव्या दिवशी विद्यार्थिनींमध्ये उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे म्हणून सावदा येथील औद्योगिक वसाहतीत विविध उद्योग आणि लघुउद्योग संस्थांना भेट दिली,  त्याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक प्रभुदास जंजाळकर संचालक रामेश्वरम् इंडस्ट्री- एमआयडीसी सावदा यांनी मार्गदर्शन केले, तसेच या क्षेत्रातील श्रीकृष्ण इरिगेशन इंडस्ट्री, मिल्क डेअरी, गृह उद्योग अश्या उद्योग समूहांना भेट दिली व  त्यातील कौशल्य जाणून घेतले. अश्या प्रकारे सहा दिवस विविध कार्यक्रम राबवून आत्मनिर्भर युवती अभियान" संपन्न करण्यात आले आणि अजा सहाव्या दिवशी या अभियानाचा समारोप करण्यात आला.

    आजचे समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पी.डी.पाटील,अधिसभा सदस्य, कबचौउमवि, जळगाव यांनी आत्मनिर्भर कसे व्हावे,आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य विकसित करावेत, शिकत असतानाच इतर बौध्दीक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला तरच व्यक्तित्त्वाचा सर्वांगीण विकास होतो,फक्त विशिष्ट एका विषयाचा अभ्यास म्हणजे शिक्षण नाही तर आपल्या अंगी असलेले विविध कलागुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय, महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन त्या कार्यक्रमाचे महत्त्व जाणून घेतले तर तुमचे भविष्य उज्वल असेल असे सांगितले,  तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे यांनी ही आव्हान केले की विभागाच्या वतीने अनेक बौद्धिक कार्यक्रम, विचारवंतांचे व्याख्यान, कार्यशाळा आयोजित व  इतर कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यात प्रामुख्याने भाग घ्यावा, त्यातून तुमच्या ज्ञानात एक वेगळ्या विषयाची भर पडते आणि विविध विषयांवर आपले विचार फुलत असतात, अश्या कार्यक्रमांतूनच खरे व्यक्तित्व घडत असते म्हणून जीवनाला आकार देणाऱ्या या कार्यक्रमाचा युवतींनी भरपूर लाभ घेतला पाहिजे हीच शिक्षकांची अपेक्षा असते असे प्रतिपादन केले. प्रसंगी पौर्णिमा कोळी व  तेजल वयकोळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केला सदर कार्यक्रमाला डॉ.जयश्री पाटील युवती सभा प्रमुख, डॉ.सरला तडवी, डॉ. राजश्री नेमाडे, डॉ.सविता वाघमारे, डॉ.सीमा बारी, प्रा.नाहीदा कुरेशी प्रा.अदिती ढाके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्र संचालन नेहा पाटील व आभार सुमय्या तडवी या विद्यार्थिनीने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.