धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा रावेर येथे भाविकांची मागणी
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा रावेर येथे भाविकांची मागणी
लेवाजगत न्यूज रावेर-अमरावती येथील घनश्याम राजेंद्र ढोले याने समर्थ वाडी संस्थानवर केलेल्या खोट्या व निराधार आरोपांमुळे धार्मिक भावना दुखावल्या आहे. त्यामुळे ढोले यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अमरावती येथील समर्थ वाडी हे धार्मिक संस्थान असून, राज्यासह देशभरात या संस्थानचे भाविक मोठ्या संख्येने आहेत. कोणतेही प्रसिद्धीच्या मागे न लागता संस्थानचे
प्रमुख विश्वस्त भाऊसाहेबांनी आपल्या हयातभर योगिराज गोविंद महाराज यांनी घालून दिलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अविरत सुरू ठेवल्या आहेत. यासाठी त्यांनी आपल्या हयातीत अपारश्रम व कष्ट सोसले आहेत. मात्र, ढोले यांनी खोटे तथा तथ्यहीन आरोप केल्याने धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी तुषार मानकर, सुधिर मानकर, अक्षय मानकर, शुभम मानकर, हर्षल मानकर, स्वर्णिम मानकर आदींनीनिवेदनाद्वारे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत